सोमवार, २६ डिसेंबर, २०२२
पंचशिलनगर मधील कामे
शनिवार, २४ डिसेंबर, २०२२
पंचशिलनगर विकास मंच
शनिवार, १० डिसेंबर, २०२२
एका मतदाराच्या नजरेतून..
सध्या ग्रामपंचायत निवडणूक चे वारे जोरदार चालू आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी ग्राम स्तरावर लोकांचा सहभाग असण्यासाठी या निवडणुकांची उपयुक्तता खुपच महत्वाची असते.ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कमालीची चुरस आपल्याला बघायला मिळते.एक एक मत महत्वाचे मानले जाते.सरूड सारख्या ग्रामपंचायती वर एकाच गटाचे तब्बल पन्नास वर्ष वर्चस्व राहीलेले आपल्याला बघायला मिळते.इतक्या वर्षाचे वर्चस्व अर्थातच चांगल्या कामाची पोचपावती असते.सगळे काही आलबेल असताना सुध्दा काही बाबतीत कामांची आवश्यकता आहे, काही कामांची पुर्तता होणे गरजेचे आहे अस माझ्या सारख्या मतदाराला वाटते.खर तर ज्या बाबतीत काम होणे गरजेचे आहे त्या विषयांचा समावेश कुठल्याच पार्टिच्या किंवा गटाच्या अजेंडा वर नसतो.आणी म्हणूनच मला ग्रामस्तरावर जी कामे होणे आवश्यक वाटतं ती मी पुढे शब्दबद्ध करत आहे.सत्तेवर येणारे पॅनेल ही कामे पुढे रेटतील अशी मला आशा वाटते.किंबहुना पुढे जाऊन काम करण्यासाठी त्यांना यांचे नियोजन करता येण सोपं जाईल अस मला वाटतं.ती कामे पुढीलप्रमाणे...
1. वॉर्ड क्र. १ मध्ये हरीजनवाड्याचा समावेश आहे.येथील लोकांची मागणी आहे या हरीजनवाड्याचे सर्व सरकारदप्तरी नाव बदलून ते पंचशिलनगर व्हावे.
2. दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत व वैयक्तीक लाभाच्या योजनांबद्दल नागरिकांना पुरेशी माहीती नसते.नागरिकांना ही माहीती मिळावी यासाठी महीन्यातून किमान एकदा नागरिकांचा उद्बोधन वर्ग घ्यावा.
3.वैयक्तिक योजनांचा लाभ खुपदा तेच तेच घेत असतात.अशा लाभार्थ्यां शिवाय ज्यांना कधीच लाभ मिळाला नाही किंवा योजनेस पात्र आहेत अशांना लाभ मिळण्याची व्यवस्था पारदर्शक रित्या व्हावी.
4.घरफाळा भरला नाही किंवा पाणीपट्टी भरली नाही म्हणुन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कामासाठी लागणारे दाखले अडवून ठेवले जाणार नाहीत याकडे लक्ष दिले जावे.
5.दरवर्षी कोणत्या योजनेसाठी किती रक्कम खर्च केली गेली याची प्रसिध्दी केली जावी.विशेषतः दलित वस्ती वर खर्ची करण्यात येणारी रक्कम
6.गावामध्ये असणार्या प्राथमिक,माध्यमिक शाळांचा गुणवत्ता व दर्जा उत्तम असण्यासाठी विशेष बाब म्हणून सरंपचानी प्रत्येक महीन्यातून एकदा शाळांचे जेष्ठ शिक्षक व मुख्याध्यापक यांची आढावा बैठक घ्यावी.
7.सरूड गावामध्ये प्रक्टिस करणारे डॉक्टर्संनी आपले दवाखाने सरुडकर नागरिकांसाठी आहेत हे भान ठेवून सदैव गावात उपस्थित रहावे व बाहेर गावी असणार्या त्यांच्या ओपीडीज बंद कराव्यात जेणे करून गावातील रुग्णाची अजीबात आबाळ होणार नाही याची दक्षता सरपंच व नुतन सदस्यांनी घ्यावी.
8.सरकारी दवाखान्यातील कर्मचारी कामचुकार पणा करणार नाहीत व ते आपल्या ड्युटीवर नियमीत हजर राहतील याकडे लक्ष देणे.तसेच गावासाठी जादा कर्मचार्यांची मागणी करणे.
9. सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीयांना सुध्दा दवाखान्याचा खर्च परवडत नाही हे बघता गावातील डॉक्टर असोशियशन बरोबर बैठक घेऊन दवाखान्याचे चार्जेस पन्नास टक्क्याने कमी होतील असा प्रयत्न करणे.
10.गावातील नळ पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करणे व वैयक्तीक मालकिच्या नळाच्या पाण्याचा उपव्यय होत नाही याची खात्री करणे.
11.गावातील वाचनालयाचा दर्जा सुधारणे.नवीन पुस्तके खरेदी करणे. तसेच वाचनालयास स्वतंत्र इमारतीसाठी प्रयत्न करणे.
12. बलोपासनेचे महत्व व कुस्ती प्रेमींसाठी तालिम अद्ययावत करणे.
13.खेळामध्ये गावची मुले प्रगतीपथावर राहण्यासाठी शाळांमधून खेळांचे मार्गदर्शन योग्यरित्या होतं का यावर लक्ष ठेवणे.
14.ग्रामस्तरावर विवीध क्षेत्रामधील यशस्वितांचा गौरव करणे. त्यासाठी ग्रामपंचायती मार्फत सरुड -रत्न पुरस्काराची स्थापना करणे व दरवर्षी त्याचे वितरण करणे..
एक मतदार म्हणून माझ्या गावात वरील गोष्टी व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. काही गोष्टि अर्थात अवाजवी असू शकतील.व्यक्ती परत्वे त्या वेगळ्या सुध्दा असू शकतील...
सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०
अरण्यरूदन
बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०
अलगिकरणःमाझा अनुभव
एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने मी सोमवारी स्वँब दिला.मलकापूर येथील कोवीड सेंटर ने आमची रवानगी थेट सरूडच्या महाविद्यालयात केली.त्यांच्या प्रोसेसचा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो.रिपोर्ट येई पर्यंत इन्स्टिट्यूशनल कोरोंटाईन होण क्रमप्राप्त होत.म्हणून मग आम्ही सरुड कॉलेजवर अलगीकरण कक्षात दाखल झालो.कॉलजेच्या नवीन आणी दर्जेदार इमारतीमध्ये अलगीकरण कक्ष उभारला आहे.कॉलेजच्या या इमारतीचा ताबा आता अलगिकरण कक्ष म्हणून आरोग्य विभागाकडे आहे.
आम्ही या अलगिकरण कक्षात दाखल झालो तेंव्हा दोन रुम मध्ये आधिच काही रुग्ण होते.म्हणून मग आम्ही तिसर्या रूम मध्ये प्रवेश केला जी रुम unlock होती. रुम मध्ये बेडस जमीनीवरच अथंरलेले होते. आधीच्या रुग्णांनी वापरलेल्या चादरी रुम मध्ये च असलेल्या किचन कट्ट्यावर अस्ताव्यस्त फेकल्या होत्या.रूम मध्ये उंदीर मामानी घाण केलेली होती.भर म्हणून बेडक्या सुध्दा होत्या.आणी रुम भरुन एक एकमेवाद्वितीय असा दर्फ येत होता.जो तुम्ही आता कदाचित फिल पण केला असेल.सो रूम अस्वच्छ होती आपल्या लक्षात आलं असेल.थोडक्यात काय बरेच दिवस रूमची स्वच्छता केलेली नव्हती.
मी या कक्षाचे इनचार्ज जाधव साहेबांना कॉल केला.त्यांचा नंबर आम्हाला गेटवर मिळाला होता.प्रत्यक्ष त्यांच दर्शन नव्हत झालं.साहेबांना सांगितलं की रुम अस्वच्छ आहे आणी रुम स्वच्छ करून मिळावी.साहेब म्हणाले रुम कालच स्वच्छ केलीय,सँनिटाईज सुध्दा केलीय आणी हवतर मी फोटो पाठवतो म्हणाले. पण मग मी त्यांना सध्याची अवस्था सांगितली तर ते बरं बरं म्हणाले.पुढचे दोन दिवस त्या रुम मध्ये आम्ही मुक्काम केला.
या अलगिकरण कक्षाचे एक वैशीष्ठ्य म्हणजे स्नानगृह व स्वच्छता गृहाची पुरेशी संख्या होय.स्वच्छतागृह आधुनिकपध्दतीचे कमोड आहेत. मात्र अलगीकरण केंद्रात येणारे रुग्ण हे खेड्यातील आणी कमोड वापर करता न येणारे असल्याकारणाने या कमोडचं सौदंर्य कमालीचे वाढलेले स्पष्ट दिसत होतं.सो जिव मुठीत घेऊन मुश्किलीने तिथे विधी उरकण्यावाचुन गत्यंतर नव्हता.कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने केंद्राच्या या इमारती मध्ये रुग्णाशिवाय कोणी ईकडे फिरकत नाही.कर्मचारी बिलकुल या केंद्रात येत नाहीत.इमारती बाहेरील लाईटस लावणे आणी बंद करणे हे रुग्णांचेच काम. कर्मचारी लांबुनच सांगतात लाईट बंद करा चालू करा.अर्थात हे मी समजू शकतो.त्यांना त्यांचा जिव महत्त्वाचा वाटणे स्वाभाविक आहे.इमारती मध्ये सर्व रुम ज्या उघड्या होत्या तेथील लाईटस आणी फँन चालू होते ते आम्ही बंद केले.मात्र अश्या अजूनही काही रूम होते त्यातील लाईट आणी फँन चालूच होते.ते आम्हाला बंद करता आले नाहीत.राष्ट्रीय संपत्तीची अशी हानी होताना आम्हाला खुप वाईट वाटलं.दोन दिवसाच्या तेथील वास्तव्यात सकाळी नाष्टा,दोनवेळचं जेवण आणी सांयकाळी चहा मिळाला.
तिसर्या दिवशी इनचार्ज साहेब सुहास्य वदनी उगवले.त्यांनी आमचं टेपंरेचर घेतलं जे खुप सामान्य होतं.अर्थात ते इमारतीच्या बाहेर २० फुट अंतरावर आम्हाला बोलावून घेवून त्यांनी टेंपरेचर घेऊन औषधं लागली तर सांगा म्हणाले.दोन तीन दिवस तब्बेत चांगली असल्यांने रिपोर्ट नॉर्मल येईल आम्हाला कुठं इथे या ठिकाणी कायम राहायचयं असा विचार करून राहीलो. मात्र आरोग्य विभागाचं किंवा हे अलगिकरण केंद्र ज्यांच्या अखत्यारीत आहे त्यांच केंद्राकडे साफ दुर्लक्क्ष आहे.हि गोष्ट खरंच अक्षम्य आहे कारण कोरोना निगेटीव्ह असलेल्या पेशंटला इथल्या अस्वच्छतेमुळे प्लेग किंवा अन्य कुठले तरी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरंतर व्यवस्थापन गुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा प्रजाहित दक्ष कोल्हापुरचे छत्रपती शाहु महाराज यांनी केलेल्या साथीच्या रोगाचे निंयत्रण व रोग्यांचे रिहँब करण्याचं तंत्र होतं त्याचा वारसा सांगणार्या माझ्या महाराष्ट्रात कुठतरी असाही वाईट अनुभव येतो.तेंव्हा वाटतं सार्वजनिक सेवांच्या बाबतीत आणिबाणीच्या काळासाठी आपण प्रिपेर्ड राहणं आवश्यक आहे.मात्र सगळंच चित्र काय गडद काळं नाही.डॉक्टर्स,पँरामेडीकल स्टाफ, पोलीस,सरकार उत्तम काम करत आहेत त्यांना सलाम आपला.
काल रात्री माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला.ही एक मस्त छान पॉझिटिव्ह गोष्ट मात्र घडली आणी आता मि अगदी ठणठणीत घरातच रुम कोरोंटाईन आहे..
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०
शिक्षक दिन
रविवार, २४ मे, २०२०
जनता,नेता आणी कार्यकर्ता
बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९
सार्वकालीन गांधीजी
१९३३-३४ ची गोष्ट Marylebone cricket club(MCC) भारतात क्रिकेट खेळायला आला होता.डग्लस जार्डिन त्यांचा कप्तान होता.भारता कडून फलंदाजीची सुरवात विजय मर्चंट करणार होते.विजय मर्चंट यांची बहीण क्रिकेट ची चांगलीच फँन होती.सामना अहमदाबादला खेळवला जाणार होता.आणी शहरात गांधीजी पण होते.विजय मर्चंट यांची बहीण गांधीजीना भेटायला गेल्या. ऑटोग्राफ साठी त्यांनी गांधीजीना आग्रह केला.गांधीजीनी वही हातात घेतली.एका पानावर त्यांना MCC च्या खेळाडूंंचे ऑटोग्राफस दिसले.एकदंरीत सोळा खेळांडुंच्या सह्या होत्या.गांधीजीनी पेन हातात घेतलं आणी १६ च्या खाली १७ वा नंबर टाकला.पुढे MK GANDHI अस लिहलं व सही केली.गांधीजींची ही कृती किती साधेपणाची आणी नम्र पणाची आहे.मी आपल्या पैकीच एक आहे आणी वेगळा कोणी नाही हे दर्शवण्याचा तो एक छोटासा प्रयत्न.इग्रंज सरकार विरूध्द माझा लढा असला तरी सर्व सामान्य इंग्रजी माणसाच्या विरूध्द मी नाही हे गांधीजींचे सांगणे होते.या घटनेचा उल्लेख 'POLITICAL HUMAR' या पुस्तकामध्ये आला आहे.जुडसन कॉर्नली त्याचे लेखक आहेत.
गांधीजीच्या या कृतीचा उल्लेख करून मी पुढे म्हणालो की गांधीजीच्या जयंती दिना निमीत्त गांधीजीचा नम्रपणा आपण स्विकारायला पाहीजे.गांधीजीच्या विचाराची अमंलबजावणी न करता त्यांच्या तत्वज्ञानावर केवळ विद्वत्ता प्रचूर भाषणं देण सर्वस्वी चुक राहील.आणी म्हणून प्रास्ताविक कोणी केलं या पेक्षा गांधीजींच्या विचाराचा जागर होणं महत्वाचं.
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
Good events bad events..
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९
देणार्याने देत जावे..
त्या सकाळी लवकर उठलो.रात्रभर तशी झोपच नव्हती लागली.सवयी प्रमाणे मोबाईल हातात घेतला.ट्विटर वर नजर फिरवत होतो.तेवढ्यात एका ट्विट ने माझ लक्ष वेधून घेतलं.आनंद महिन्द्रा यांच ट्विट होत ते.MAHINDRA& MAHINDRA कंपनीचे प्रमुख आनंद महिद्रां यांच.ते लिहितात "RISE is not just a philosophy that lies on the shelf & cited only in interviews & speeches. It’s what we practice; what we live & breathe every day"(संकटावर मात करून पुन्हा ताठ मानेनं उभा राह्यच असत हे केवळ आम्ही सभा समारंभात सांगत नाही तर त्याची आम्ही अक्षरशः अंमलबजावणी करतो).किती सुंदर विचार आहे ,नय?
सकाळचे सगळे सोपस्कार आवरून मी शाळेत गेलो. थोडा वेळ गेला असेल नसेल तोवर एक ट्रक शाळेच्या दारात आला.'टेक महिन्द्रा' कंपनी कडून आमच्या शाळेला मदत घेऊन आलेला ट्रक होता तो.'टेक महिद्रा' हि महिंद्रा समुहाचीच एक कंपनी आहे.महापूर येवून गेला .खर शिरोळ तालुक्यात प्रचंड नुकसान झाल.अनेकांचे संसार उधवस्थ झाले.जनावरे दगावली.शिरोळ मधील त्रेपन्न पैकी सत्तेचाळीस गाव महापूराच्या दणक्यात सापडली.गावोगाव हीच महापुराची अवस्था होती.महापूर एक पण कहाण्या अनेक.प्रत्येकाची कहाणी वेगळी पण दुखाची तीव्रता तीच.अशावेळी माणुसकीचा प्रत्यय आला.पुणे मुंबई तसेच उर्वरीत महाराष्ट्रामधून अनेक सामाजिक संस्था, अनेक कंपन्या अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी शिरोळ मधील पुरग्रस्त लोकांना मदत केली.माणुसकीचा गहिवर पाहायला मिळाला.तालीक्यातील अनेक शाळांना मदत मिळाली.कुणी विध्यार्थ्यांना वह्या पुस्तके दिली.कुणी दप्तर दिल. मात्र शाळांचे जे नुकसान झाल होत ते सुद्धा प्रचंड होत.अनेकांनि शाळांना मदत केली.
महापूर येवून गेल्यानंतर आमच्या शाळेला tech mahindra कंपनीच्या लोकांनी भेट दिली.खरतर ते जेव्हा शाळेत आले होते तेव्हा शाळेला सुट्टी होती.शनिवार होता तो.सकाळची शाळा होती.दुपार नंतर सुट्टी होती. नेमक त्याच दरम्यान आमच्या शाळेत महिंद्र ग्रुपचे राजेन्द्र शिखरे व त्यांचे सहकारी भेट देवून गेले.शाळेच्या परिसरात असलेल्या कुणा कडून त्यांनी आमचा नंबर मिळवला.आम्हाला त्यांनी संपर्क केला व आवश्यक ती कागदपत्र तयार ठेवयाला सांगितल.त्यांनी आम्हाला कागदपत्र मोबैल वर पाठवयाला सांगितली.त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही सगळ केल.आम्हाला अस वाटल कि सगळीकड ज्या प्रमाने अनुभव येतो तसच काहीतरी होईल.साधारण महिनाभर गेला दरम्यान मध्यंतरी पुन्हा एकदा पूर येतोय कि काय अशी अवस्था झाली होती.त्यामुळे महिंद्र ग्रुप च्या लोकांना तारखा ठरवणे अवघड बनले.आणि एक दिवस मला राजेंद्र शिखरेंचा फोन आला.कि आम्ही २० सप्तेम्बर ला येत आहोत.सुरुवातीला विस्वासच बसला नाही.मात्र ते आले आणि प्रचंड मदत दिली.शाळेच्या सर्व गरजा विचारात घेवून त्यांनी खूप काही दिल आम्हाला.त्यात महत्वाच म्हणजे दोन संगणक,प्रिंटर,साउंड सिस्टीम ,फिल्टर ,कपाते व इतर बरच काही. जवळ पास लाखो रुअपे किमतीच्या वस्तू त्यांनी आम्हाला दिल्या.कंपनीच्या टीम बरोबर त्यंच्या हेड कल्पना मेडम होत्या.तरुण अभियान्त्यंची फौज सुद्धा होती.
मी विचार करतो लोक शाळांना एवढी भरभरून मदत कशी करतात?मला सापडलाय त्याच उत्तर लोक शाळांना राष्ट्रभक्तीच व्यासपीठ समजतात.शाळे मध्ये शिखनारी आजची मुले उद्याची इंजिनिअर्स,डॉक्टर्स,वकील,सैन्याधिकारी किव्हा शिक्षक असतील.ती जेव्हा आपल्या क्षेत्रात जातील तेव्हा ती आपल्या देशासाठी चांगल योगदान देतील असा विश्वास असतो लोकांना.म्हणून एखादि शाळा संकतात सापडते तेव्हा भरघोस मदत करायला लोक पुढे सरसावतात....
रविवार, ११ मार्च, २०१८
“Experiences about the desired change in students behavior by implementing the guidelines acquired through ETF meetings”.
शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७
PSM
बालक नवीन काय तरी शिकतो तो कृतीतूनच.त्याच्या निसर्गदत्त भावनांना रोकायचं आणि त्याच्या डोक्यात कोंबायचं हि जुनाट पद्धती आपण फेकून देत आहोत.त्या ऐवजी त्याच्या सहज प्रवृत्ती प्रमाणे त्याला कृती प्रवण बनवायचं. त्यासाठी अनेक उपक्रम लाभदायक ठरतील.माझ्या शाळेत हळूहळू असे नवं नवीन उपक्रम राबवायला सुरु केलं आहे. पूर्वी देखील असे उपक्रम राबविले जात असायचे पण आता अधिक डोळस पणे असे उपक्रम राबविले जात आहेत.
अ) जयंत्या-
विद्या विनयेन शोभते असं म्हणतात . बालक हा मातीचा गोळा असतो . त्याला जसा आकार द्यावा तास तो होतो . या वयात त्याच्या समोर आदर्श व्यक्तीची उदाहरणे ठेवली तर तो देकील तश्या आदर्श विचारांनी युक्त होऊ शकतो . manners are not taught manners are caught. हे इंग्रंजी वाक्य असच अर्थपूर्ण आहे . तुम्ही असं वागा असे न म्हणता थोर माणसांनी असं वर्तन केलं होत हे आपण बालकावर ठसवू शकतो . थोरा मोठ्या माणसांच्या जयंती साजरी करणे हि बालकावर संस्कार करण्याची सुसंधी आहे असं मला वाटत . म्हणूनच माझ्या शाळेत थोर स्त्री पुरुषांच्या जयंत्या स्मृतिदिन आम्ही साजरे करतो.
ब )English Learning club-
प्रगती आणि इंग्लिश यांचं सख्य काय आहे हे सगळ्यांना माहित आहे . भारतासारख्या अनेक भाषा बोलणाऱ्या देशात आंग्ल भाषा लोकांना जोडण्याचं काम करते आहे . उच्च शिक्षण असो कि व्यापार असो इंग्रजी जाणणारा हा पुढे जातो हे वास्तव आहे . मराठीचा आदर करण्याबरोबर इंग्रजीचा पुरस्कार करण्याचे धोरण आपण स्वीकारले आहे. इंग्रजीची भीती कमी व्हावी म्हुणुन मुलांना बोलायला उद्युक्त केलं जाते . बालकें त्यांच्या मित्रांच्या सोबत न घाबरता इंग्रजी बोलावेत म्हणून शाळेत इंग्लिश लेअर्निग क्लब सुरु केला आहे.
शाळेतील इतर उपक्रम बद्दल नंतर बोलूच पर्यंत नमस्कार
शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७
PATRAKAR DIN
आज पत्रकार दिन. महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी. कोणत्याही लोकशाहीवादी देशामध्ये पत्रकारितेला अन्यनसाधारण महत्व असते आणि त्याच कारणही तसेच आहे लोकशाहीचा चतुर्थ स्थंम्ब म्हणजे पत्रकारिता होय. लोकांच्या इच्छा,मत त्याच्या महत्वकांक्षा यांचं प्रतिबिंब म्हजे वृत्तपत्रे. राजकारण्यांना लोकमानस कळतो तो वृत्तपत्रांच्या माध्यमातून. आज दळणवळणयाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती झाली आहे. वृत्तपत्राच्या जोडीला सोसिअल मीडिया आज लोकांच्या दिमतीला आहे. माहितीच्या विस्फोटाचा हा काळ आहे. एका क्लिक मध्ये आपणाला जगभरचे ज्ञान मिळते. पण त्यामुळे पत्रकारांच्या आणि हौसेखातर काहीही लिहिणारांच्या वर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. लेखणीचा वापर संयमशील रित्या व्हायला हवा. लोकांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचं काम पत्रकारांनी करन गरजेचं आहे.
सामान्य माणसांनी पत्रकाराच्या त्यागाला सलाम केला पाहिजे. यावर्षीची जर आकडेवारी काढली तर फार मोठा धक्का आपल्याला बसेल. अनेक पत्रकारांना यावर्षी आपल्या प्राणाला मुकावं लागलंय.लोकांसाठी त्यांना आपला जीव द्यावा लागला. पत्रकारांना मी आजच्या दिनी शुभेच्या तर देतोच पण ज्यांनी हौतात्म्य पत्करलं अश्या पत्रकारांचे मी स्मरण करतो.
ओमपुरी हा चतुरस्त्र अभिनेता आज आपल्याला सोडून गेला.. त्याची कमी आपल्याला वाटणार आहे.
http://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1378229/actor-om-puri-passes-away-dead/
गुरुवार, ५ जानेवारी, २०१७
शनिवार, २ जानेवारी, २०१६
जनस्वास्थ्य सप्ताह२०१५
या कार्यक्रमाच्या पहील्या दिवशी शालेत माता पालक मेलावा आयोजित केला होता.यत्र नार्यस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवत: अशी नारीचे म्हणजे आवाहन करणार्या घोषणा देखील वीद्यार्थ्यांनी दिल्या.
सैनिक : राष्ट्राच्या सीमांचा आणि मूल्यांचा रक्षक
सैनिकाचे कार्य अनेकदा फक्त देशाच्या सीमांचे रक्षण करणे यापुरते समजले जाते. मात्र, त्यांची खरी जबाबदारी त्याहीपेक्षा मोठी आहे. सैनिक हा केव...
-
पत्रकार दिन आज पत्रकार दिन. महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी. कोणत्याही लोक...
-
प्रगत शैक्षिणक महाराष्ट्र हा महाराष्ट्राला प्रगती पथावर नेणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आता महाराष्ट्राच्या शाळांमधून सुरु झालेला आहे.महाराष...
-
सैनिकाचे कार्य अनेकदा फक्त देशाच्या सीमांचे रक्षण करणे यापुरते समजले जाते. मात्र, त्यांची खरी जबाबदारी त्याहीपेक्षा मोठी आहे. सैनिक हा केव...








