शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

PSM

प्रगत शैक्षिणक महाराष्ट्र हा महाराष्ट्राला प्रगती पथावर नेणारा महत्वाकांक्षी प्रकल्प  आता महाराष्ट्राच्या शाळांमधून  सुरु झालेला आहे.महाराष्ट्राला  देशपातळीवर प्राथम तीन क्रमांकावर आणण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणावयाचे आहे. विध्यार्थ्याला शिकवण्यापेक्षा त्याला शिकण्यात मदत करण्याची भूमिका गुरुजींनी करायची आहे. विद्यार्थी ज्ञानाचे रचियेते असतात ते ज्ञानाची निर्मिती करू शकतात हि एक अभिनव संकल्पना आहे. जेव्हा व्यक्ती स्वतः ज्ञान  मिळवतो तेव्हा ते ज्ञान चिरकाल टिकणारे असते हि वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्याने ज्ञान मिळवन्यासाठी त्याला उद्युक्त करणे. त्याच्या विचारशक्तीला चालना देणे.त्याच्या मनातं उत्सुक्ता निर्माण करण्याचे काम गुरुजीचं आहे. म्हणजेच आता घोकमपट्टीला फाटा द्यायचा आहे. गुरुजी आता lecture देणार नाहीत ते आता facilitator होणार आहेत.विध्यार्थ्याला सारथी नकोय त्याला साथी हवाय हा दृष्टिकोण गुरुजींनी बाळगायचा आहे.  facilitator हा शब्द म्हणूच अर्थपूर्ण वाटतो. 
                                                        बालक नवीन काय तरी शिकतो तो कृतीतूनच.त्याच्या निसर्गदत्त भावनांना रोकायचं आणि त्याच्या डोक्यात कोंबायचं हि जुनाट पद्धती आपण फेकून देत आहोत.त्या ऐवजी त्याच्या सहज प्रवृत्ती प्रमाणे त्याला कृती प्रवण बनवायचं. त्यासाठी अनेक उपक्रम लाभदायक ठरतील.माझ्या शाळेत हळूहळू असे नवं नवीन उपक्रम राबवायला सुरु केलं आहे. पूर्वी देखील असे उपक्रम राबविले जात असायचे पण आता अधिक डोळस पणे असे उपक्रम राबविले जात आहेत. 
अ) जयंत्या-
विद्या विनयेन शोभते असं म्हणतात . बालक  हा मातीचा गोळा असतो . त्याला जसा आकार द्यावा तास तो होतो . या वयात त्याच्या समोर आदर्श व्यक्तीची उदाहरणे  ठेवली तर तो देकील तश्या आदर्श विचारांनी युक्त होऊ शकतो . manners are not taught manners are caught. हे इंग्रंजी वाक्य असच अर्थपूर्ण आहे . तुम्ही असं वागा असे न म्हणता  थोर माणसांनी असं वर्तन केलं होत  हे आपण बालकावर ठसवू शकतो . थोरा  मोठ्या माणसांच्या  जयंती  साजरी करणे  हि  बालकावर संस्कार करण्याची सुसंधी आहे  असं मला  वाटत .  म्हणूनच माझ्या  शाळेत  थोर स्त्री पुरुषांच्या जयंत्या  स्मृतिदिन  आम्ही साजरे करतो. 
ब )English Learning club-
प्रगती आणि इंग्लिश यांचं सख्य  काय आहे हे सगळ्यांना माहित आहे . भारतासारख्या  अनेक भाषा बोलणाऱ्या  देशात आंग्ल  भाषा  लोकांना  जोडण्याचं काम करते आहे . उच्च  शिक्षण असो कि व्यापार असो इंग्रजी  जाणणारा  हा  पुढे जातो  हे वास्तव आहे . मराठीचा आदर करण्याबरोबर  इंग्रजीचा  पुरस्कार   करण्याचे  धोरण  आपण स्वीकारले आहे.  इंग्रजीची  भीती कमी व्हावी म्हुणुन  मुलांना बोलायला उद्युक्त  केलं  जाते . बालकें  त्यांच्या  मित्रांच्या सोबत न  घाबरता इंग्रजी  बोलावेत म्हणून शाळेत  इंग्लिश लेअर्निग  क्लब सुरु केला आहे. 
                       शाळेतील इतर उपक्रम बद्दल  नंतर   बोलूच   पर्यंत  नमस्कार 













शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

PATRAKAR DIN

पत्रकार दिन 

आज पत्रकार दिन. महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची  मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी.  कोणत्याही लोकशाहीवादी देशामध्ये पत्रकारितेला अन्यनसाधारण महत्व असते आणि त्याच कारणही तसेच आहे लोकशाहीचा चतुर्थ स्थंम्ब म्हणजे पत्रकारिता होय. लोकांच्या इच्छा,मत त्याच्या महत्वकांक्षा यांचं प्रतिबिंब म्हजे वृत्तपत्रे. राजकारण्यांना लोकमानस कळतो तो वृत्तपत्रांच्या माध्यमातून. आज दळणवळणयाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती झाली आहे. वृत्तपत्राच्या जोडीला सोसिअल मीडिया आज लोकांच्या दिमतीला आहे. माहितीच्या विस्फोटाचा हा काळ आहे. एका क्लिक मध्ये आपणाला जगभरचे ज्ञान मिळते. पण त्यामुळे पत्रकारांच्या आणि हौसेखातर काहीही लिहिणारांच्या वर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. लेखणीचा वापर संयमशील रित्या व्हायला हवा. लोकांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचं काम पत्रकारांनी   करन गरजेचं आहे.
सामान्य माणसांनी पत्रकाराच्या त्यागाला सलाम केला पाहिजे.  यावर्षीची जर आकडेवारी काढली तर फार मोठा धक्का आपल्याला बसेल. अनेक पत्रकारांना यावर्षी आपल्या प्राणाला मुकावं लागलंय.लोकांसाठी त्यांना आपला जीव  द्यावा लागला. पत्रकारांना मी आजच्या दिनी शुभेच्या तर देतोच पण ज्यांनी हौतात्म्य पत्करलं अश्या  पत्रकारांचे मी स्मरण करतो.



ओमपुरी हा चतुरस्त्र अभिनेता आज आपल्याला सोडून गेला.. त्याची कमी आपल्याला वाटणार आहे.
http://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1378229/actor-om-puri-passes-away-dead/










शनिवार, २ जानेवारी, २०१६

जनस्वास्थ्य सप्ताह२०१५

जनस्वास्थ्य दक्षता समीती कोल्हापूर,कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाला मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनस्वास्थ्य अभियानामध्ये आमची शाला दि न्यू हायस्कूल चिंचवाड सहभागी झाली.आज ज स्त्रीचे महत्व आहे.व्यक्तीचा पहीला गुरू म्हणजे माता.म्हणून स्त्रियांना सहभागी करून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य आहे,हे ओलखून माता पालक मेलाव्याचे शालेत यशस्वी आयोजन झाल.श्री.जंगम सर यांनी उपस्थीतांचे स्वागत केले व कार्यक्रमाबद्दल माहीती दिली.मुख्याध्यापक तेलवेकर यांनी आपल्या मनोगतामधे पालकांनी मुलांना ओलखलं पाहीजे अस मत व्यक्त केले.त्याचबरोबर पालकांनी शिक्षकाची तर शिक्षकांनी पालकाची भूमिका केली पाहीजे अस प्रतिपादन केलं.श्री सुतार सर यांनी सर्वांचे आभार मानले,व मेलावा सपंन्न झाला .  सायंकाली ४वा.सायकल फेरी काढण्यात आली.या वेली विद्यार्थ्यानी पर्यावरण बचाओ आणी प्रदुषण टाला असा संदेश देणारे फलक आपल्या सायकल वर लावले होते. प्रदुषण मुक्त पर्यावरण टिकवण्याचेगासमोर ग्लोबल वॉर्मिंग बरोबरच पर्यावरण,प्रदुषण व व्यसनाधीनता यासारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत.हे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करण्याची गरज आहे.यासाठी १जानेवारी ते ७ जानेवारी अखेर "जनस्वास्थ्य सप्ताह" कार्यक्रम आहे.
                               या कार्यक्रमाच्या पहील्या दिवशी शालेत  माता पालक मेलावा आयोजित केला होता.यत्र नार्यस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवत: अशी नारीचे म्हणजे आवाहन करणार्या घोषणा देखील वीद्यार्थ्यांनी दिल्या.
                दिनांक ३ जानेवारी ला सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रचंड योगदान दिल आहे.त्यांच्या त्यागामुले आणी प्रेरणेमुले मुली आज सर्व क्षेत्रात चमकत आहेत.
दिनांक ५जानेवारीला आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.यावेली जयसिंगपूर चे सरकारी दवाखाना पथक शालेत उपस्थित होत.














सैनिक : राष्ट्राच्या सीमांचा आणि मूल्यांचा रक्षक

सैनिकाचे कार्य अनेकदा फक्त देशाच्या सीमांचे रक्षण करणे यापुरते समजले जाते. मात्र, त्यांची खरी जबाबदारी त्याहीपेक्षा मोठी आहे. सैनिक हा केव...